Tuesday, October 22, 2019

मनुष्य गौरव।

मनुष्य गौरव दिन-१९अक्टूबर १९२०
(पांडुरंग शास्त्री आठवले जन्मदिन)

अधः पतित हुई मनुष्य जाती
कफ़ल्लकता की चोटी पर थी।
आत्मनिष्ठा-ईशनिष्ठा से प्रेरित;
वो जीवन सुगंधी कर गए!
वो तेज पथ पर चल पड़े थे,
 तो पांडुरंगी बन गए।

मनुष्य को ऋषिसंकल्प से जोड़
"भगवान तो तेरे भीतर"
 यह गौरव खड़ा कर गए
तो पांडुरंगी बन गए।

"नाहं पशु ;अहम मनुष्य:"
आत्मसन्मान जागृत कर गए
वो तेज पथ पर चल पड़े थे,
 तो पांडुरंगी बन गए।

"दूजा अब नहीं है दूजा;
 वह तो तेरा भाई!"
सबंध बनाकर दैवी नाता,
परसन्मान का सिंचन कर गए,
वो तेज पथ पर चल पड़े थे,
 तो पांडुरंगी बन गए।

वो तेज पथ पर चल पड़े,
 तो पांडुरंगी बन गए।

गौरव मनुष्यों का साकार करने
वो यज्ञ बन कर जलते रहे,
आओ हम कहे साथ मिलकर
हे तेज पथ पर चलनेवाले
"अमृतस्य पुत्र"
 दादाजी नमस्तुभ्यं।
 दादाजी नमस्तुभ्यं।

-चेतन कोठावदे

स्वतंत्रता।

हे मातृभूमि के वीर तुझे,
माँ भारती पुकारती।
क्यों जखड़े हो निराशाओं से..
क्यों झुकें हो हताश होके..
क्या भूल गया वह इतिहास तू?
जहाँ जन्में थे वीर शिवाजीऔर तानाजी।
क्या भूल गया वह कालापानी
जो पीकर अमर हुए सावरकरजी
जो ले आये थे लहूँमे ही स्वतंत्रता
तू भी तो उनकाही वंशज...।

अत्याचारों और भ्रष्टाचार से,
अन्यायों की चीत्कार से,
कभी हिंसा से, तो कभी व्यभिचार से
आज क्रोधित हो उठी वो..
ललकार उसकी सुन जरा...
हे मातृभूमि के वीर तुझे,
माँ भारती पुकारती।

स्वतंत्रता की मोहर उठाके
केवल जी रहे जो लाचारी
मज़बूरी के सारे गुलाम बनके
भूल गए शायद; क्या थी अपनी संस्कृति।
विवशता की उन जंजालोसे
एक ध्वनि जो है उठ रही...
सुन उसे जरा..
हे मातृभूमि के वीर तुझे,
माँ भारती पुकारती।

साहस की परिभाषा अब
स्वार्थ में लिपटी हुई,
पद की लालचता तो देखों...
 जो देश से ही गद्दारी है,
 जो अपनों से जातिवाद है,
 जो मिट्टी के टुकड़ों बांटे;
  वही शक्तिमान है
इस व्यथा से जो खूब पीड़ित वो..
हे मातृभूमि के वीर तुझे माँ ने पुकारा है।

हाथ में मशाल ले अब तू,
कर शुरू युग परिवर्तन का
कर प्रतिकार ऐसा की,
तोड़ दे विकारों की बेड़ियां
खड्ग तेरा तप उठे यूँ
कर विकृतियों पर प्रहार,
उठ खड़ा हो फिरसे नौजवान
की कर उत्थान सत् विचारोंका
कर सिंचन तू संत-ऋषी परंपराओं का

कर स्वतंत्र फिरसे इस मिट्टी को यूं
जो अपनोनेही छीनी है।

सिर उठाकर फिर कहे सकेंगें..
स्वतंत्रता की माँ भारती
स्वतंत्रता की माँ भारती।।

-चेतन कोठावदे।

Wednesday, July 3, 2019

। विठ्ठल सोहळा।

सोहळा आगळा माझ्या विठ्ठलाचा
ध्वज फडके गगनी हरी नामाचा

संत जन्म वाहति जयाच्या प्रवहात
जाणा हीच भक्तिची इंद्रायणी थोर!

होता संतसंगतीचा स्पर्श
मतीचे जाय  दवडून बालपण;
मनी आपुल्याही व्याहे संतपण।

न हे कुणा गबाळ्याचे काम 
संगतीत राहण्या लागे भाग्य थोर

जिव्हेसि होता स्पर्श नामाचा 'विठ्ठल' 
जगी उद्धार जाहला तयाचा सकल

जाऊनिया चला वारिसी एकवार,
घेऊ पांडुरंगाची भेट!

सोहळा आगळा माझ्या विठ्ठलाचा
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल।।

-चेतन कोठावदे

Wednesday, May 15, 2019

मोर्चा 😎

आज दुःखाने मोर्चा काढला!!
म्हणे,आरक्षण पाहिजे त्याला!
सर्वच असतात सुखाच्या शोधात,
दुःख आले की मात्र पळ काढतात
आता आरक्षण पाहिजे त्याला!

सुखाचा तर नेहमीच सोहळा साजरा;
दुःखाच्या आगमनाने मात्र
टवकारलेल्या नजरा,
सुखासाठी नेहमी गर्दी भारी;
मग दुःखच का हो वैयक्तिक मक्तेदारी?

दुःख विव्हळले,
मग खवळले,
आता हे चालणार नाही!

साऱ्या सुखांचे दारे मोडत
दुःख निघाले बंड करत...
(एकच नारा देत..
"हमारी मांगे पूरी करो
20% आरक्षण हमे भी  दो।")

विरह,आजार, विकार,मृत्यु
ह्या सर्व जाती एकत्र जमल्या,

मग प्रत्येकाने आपले दुःख मांडले..
'कुणी घेईना आपल्यास मनावरी!
आपण सारे Temporary'
म्हणून; आता आरक्षण हवे !

दुःखाचा मोर्चा नियतीच्या
दरबारी पोचलाSSS
अन् पाहतो तो काय ??
तिथेही आधी हजेरी सुखाची!

आता मात्र दुःख चवताळले,
सुखाच्या अंगावर धावून गेले

मग दोघांची  चिखलफेक सुरु..
नियतीला पडला प्रश्न;
आता काय करू?

ऐकून सारी वार्ता,
मग नियतीने घेतले सूत्र हाती
(Silence!!)

" जाणून आहे तुमचे सारे बहाने
  आता थोड़े सबुरीने घ्यावे।

  किती डोकावे मानवी जीवनी
  हे नाही आपुल्या हाती,
  हा निर्णय असे सर्वस्वी 'त्याचा'
  आरक्षण मिळणे नाही कुणासही आता!

  प्रयोजनाने जरी मी तुम्हास धाडीले
  जीवनी मानवाच्या; तरी
  किती नांदावे सुखाने वा दुःखाने,
  हे गणित मात्र असते "त्याचे"।

  जर नियति एक नाणे अनोखे!
  तर तुम्ही नाण्याच्या बाजू दोन!
  जाणा एकचि सत्य आता;
  नियतीचे नाणे पडते नेहमी उभेच !

  सुख अन दुःख हे ध्रुव दोन,
  जशी दिवासमगुन रात्र
  अन रात्री मागुन येतो दिन
  तैसा तुमचाहि लपंडाव!!

  दुःखाचे गर्भी लपलेले सुखाचे बीज🌻
  हेच जाणा असे वास्तव!!
  म्हणून ध्यानी असुदया गोष्ट एक,

  सुखे दुःखे समे कृत्वा।
  ज्यांसी ठाऊक हा मंत्र,
  तेथे न ये कामास
  तुमचे आरक्षण तंत्र "☺️

ऐकता ऐशी नियतीची वाणी
समज उभयतांस आली!!
दुःख झाले आता शांत,
नको मुळी आता आरक्षणाचा आकांत
'सुख तर आहे माझा पठिराखा☺️
अमुचा वाद आता संपुष्टात आला'।

मंत्र मात्र विसरु नका
सुखे दुःखे समे कृत्वा!!

-चेतन कोठावदे

Saturday, April 27, 2019

राम-whatspp


(रामनवमी निमित्त) रामाचे व्हाट्सप ला पत्र!!!

हैलो व्हाट्सप,
आज तुझ्यामुळे मला अनेक भक्तांच्या
भरभरून शुभेच्छा मिळाल्या

आज तुझ्यामुळे मला माझ्या कितीतरी
 *so called* भक्तांच दर्शन झाल.

अनेकांनी message केले, status ठेवले,
चक्क काहींनी D.P. बदलले.

पण खर सांगू का ?
काही तरी खटकतय;
नाही; म्हणजे तुझ्या अस्तित्वाच कौतुक आहेच,
पण तरी ...

पूर्वी मला ही सारी मंडळी कधी मंदिरात भेटयची,
तर कधी ; 
सांज दिव्याच्या उजेड़ात राम स्तवन करताना

माझ्याशी सुख दुखः share करायची
त्यांचा अंतरंग सहज उलगडायची,

कितीही दुःखी कष्टी झाली तरी;
रामरक्षेतुन मला आपलंस करायची

एकमेकांना राम-राम म्हणत गळा भेट व्हायची,
खर तर तेव्हा मला अत्यंत हर्ष होतसे !!

पण आज जेव्हा तुझ्या माध्यमातून
ह्याना भेटलो तर...
कीव आली रे ह्यांची!

आई बापाला संपत्ति ची लालसेतुन
वेठीस धरणारा म्हणतोय,
Happy Ram navmi

ज्याच्यासाठी; कुठला धर्म नी कौनसा कुल?,
आज किया गंदा काम; कल जायेगी दुनिया भूल,
आणि तो म्हणतो
Happy Ram navmi

जमिनीच्या तुकडयासाठी
ज्याने घ्यावा भावाचाच जीव,
तोहि म्हणतोय
Happy Ram navmi

भोगा साठी बायको भोगुन
नंतर दिली वाऱ्यावर सोडुन,
तोहि म्हणतोय
Happy Ram navmi

खुर्चीलाही किळस यावी
असे राजकारण जयाच्या ठायी,
तोहि म्हणतोय
Happy Ram navmi

दिन रात एकच करी जप जो,
असेल हरी तर देईल खाटल्यावरी
तोहि म्हणतोय
Happy Ram navmi

मैत्री म्हणजे निस्वार्थता
हेही ज्याला उमगले नाही
तोहि म्हणतोय
राम राम!! राम राम!!

मग नक्की जिंकल कोण?
नीतिमत्ता की व्हाट्सप कट्टा??

मग नक्की राम उरलाय कुठे?
की सीमित फक्त प्रतिमेसाठी?

माझ्या प्रतिमेस नको केवळ हार अन फुले,
हवीत मला आशादायी रसाळ मने,
जी राम आचरतील,
अन पुन्हा रामजन्म साकारतील।

मनातला राम परत जागा व्हावा
अन रामराज्याची नांदी व्हावी
हीच एकमात्र आशा!!

माझ्यातील प्रत्येक गुणाच तुमच्या 
जीवनातील प्रगटीकरण
हाच खरा माझ्यासाठी *रामजन्म*!! 

मन से रावण जो निकाले राम उसके मन मे है।।

बघ; तुला हे  मांडता येतय का ?
तुझ्या *Status* मधून

तुमच्यतलाच,
राम!!

-चेतन

Saturday, February 9, 2019

हरवू नकोस!!


तू छावा आहे सिंहाचा;
कळपात मेंढरांच्या हरवू नकोस,

तू जन्म घेतला मानवाचा;
निर्मनुष्य होवूनी मरु नकोस,

हा खेळ असे जरी संचितांचा;
दंभात अस्तित्व हरवू नकोस।

यत्नातूनच होते यश साकार,
युयुत्सु वृत्ति टाकू नकोस।

वंशज तू अगस्त्यमुनींचा,
वेदनांच्या सागरासमोर क्षीण बनू नकोस।

वंद्य वाल्मीकिंचा तू अभ्यासक,
घात जरी झाला शस्राने;
तरी शास्त्र कधी टाकू नकोस।

आस्तिकाचे नुकसानच भारी,
म्हणून नास्तिकाचा नाद धरु नकोस।

येईल कधी चीड़ आप्त-स्वकियांचीच,
तरीही स्वधर्मा कधी त्यागू नकोस।

असे अंश तू चैतन्याचा;तैसेचि जगी सर्व,
अतः कुणास हीन गणू नकोस।

कुणी दुष्कर्मात माहीर;
तर कुणी सत्कर्मास आतुर,
"भाग्य लिहिले जाते कर्मानेच"
हे अलिखित; कधी विसरु नकोस।

अतीव रोचक महाभारत;
म्हणून गीता कधीही वगळू नकोस।
अर्जुनाच्या रुपात तूच होता;
हे तर्क लावूनही नाकारू नकोस।

तू छावा आहे सिंहाचा,
कळपात मेंढरांच्या हरवू नकोस।।


- चेतन कोठावदे