Sunday, June 7, 2026

छोटी लेखमाला : "मन गंगा नहाले...!!"

आज सकाळी घोराडेश्वर टेकडीवर जाण्याचा योग आला, टेकडीवर वसलेले महादेवाचे सुंदर मंदिर आणि आजूबाजूचे निसर्गरम्य वातावरण मनाला एक वेगळीच शांतता देणारे...अगदी दैवीच!!

मी तिथल्या हवेतली शुद्धता फुप्फुसात भरतच होतो... आणि तेवढ्यात एक कुटुंब तिथे आले—आई, बाबा आणि त्यांची तीन मुले. मंदिराकडे जात असताना त्यांनी नंदीचे दर्शन घेतले आणि आतमध्ये जाणार तोच त्यातील लहान मुलगी तिच्या मोठ्या बहिणीला म्हणाली,
"अगं, आपण मंदिरात जाऊ शकत नाही, कारण आपण अंघोळ केलेली नाही..."
हे वाक्य कानावर पडले आणि मनात विचारांची रेलचेल सुरू झाली....!!

आपण नकळत काही कर्मकांड इतकी स्वीकारली आहेत की त्यामागील मूळ अर्थच विसरून गेलो आहोत. पवित्रता म्हणजे नेमके काय? फक्त शरीराची स्वच्छता / आंघोळ केली म्हणजे पवित्रता का?
ज्याच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी शरीराची स्वच्छता आवश्यक मानली जाते, त्याच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी मनाची स्वच्छता, वाणीची शुद्धता आणि कर्माची पवित्रता अधिक आवश्यक का वाटत नाही..?
देवाला शुद्ध दूध, फुले आणि नैवेद्य अर्पण केले म्हणजे सर्व काही झाले का... ?
"शुद्धोदकं समर्पयामि" म्हंटले म्हणजे झालं का सगळ...??

समाजात आपण अनेकदा पाहतो की खोटे बोलणारे, भ्रष्टाचार करणारे, व्यसनाधीन, इतरांचा अपमान करणारे किंवा हिंसक वर्तन करणारे लोकही मंदिराच्या गाभाऱ्यात सहज घुसतात... त्यांना कोणी अडवत नाही..? (निरागस साधकांच्या विश्वातील ही घुसखोरीच म्हणा की??) 
   मग एखाद्या निष्पाप, निरागस, निस्वार्थ मुलीच्या मनात असा प्रश्न का निर्माण होतो की "अंघोळ केली नाही म्हणून आपण मंदिरात जाऊ शकत नाही?"
कदाचित आपण तिला शरीराच्या स्वच्छतेचे महत्त्व शिकवले, पण मनाच्या स्वच्छतेचे महत्त्व सांगायचे विसरलो का..??

गीतेत भगवंत अर्जुनाला सांगतो...
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥
- तुझे मन मला दे...

कारण शरीर हे वस्त्र आहे... मृत्युसमयी हे इथेच विसर्जन होणार आहे , पण आपले कर्म आपल्या आत्म्याचे चांगले किंवा वाईट भोग ठरवणार आहेत (प्रारब्ध)

म्हणुन.. Karma's neatness & cleanliness is Important !!

कुकर्म, कुवृत्ती , कुविचार हा मैला आधी धुतला पाहिजे... 

अंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होते; पण विचार, वाणी आणि कर्म शुद्ध असतील तरच मन पवित्र होते. आणि देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कदाचित याच अंतःकरणाच्या पवित्रतेतून जात असावा.
शरीराची स्वच्छता महत्त्वाची आहेच, पण मनाची स्वच्छता त्याहून अधिक महत्त्वाची आहे..!!

आता ती कशी करायची ह्यावर विचार करा...
सोचो...  सोचो... सोचना तो पडेगा ...

: सचेतन 🌿🙏🏻
चेतन कोठावदे 

Sunday, October 19, 2025

मनुष्य गौरव दिन-१९अक्टूबर १९२०

मनुष्य गौरव दिन-१९अक्टूबर १९२०
(पांडुरंग शास्त्री आठवले जन्मदिन)

अधःपतित हुई मनुष्य जाती
कफ़ल्लकता की चोटी पर थी।
आत्मनिष्ठा-ईशनिष्ठा से प्रेरित;
वो जीवन सुगंधी कर गए!!
वो तेज पथ पर चल पड़े थे,
 तो पांडुरंगी बन गए।

मनुष्य को ऋषी संकल्प से जोड़
कहां की; .. तेज का तू पुत्र है 
"भगवान तो तेरे भीतर बैठा"
तू भी शिव का वंशज है 

"नाहं पशु ;अहम मनुष्य:"
आत्मसन्मान जागृत कर गए
वो तेज पथ पर चल पड़े थे,
 तो पांडुरंगी बन गए।

"दूजा अब नहीं है दूजा;
 वह तो तेरा भाई!"
सबंध बनाकर दैवी नाता,
परसन्मान का सिंचन कर गए,
वो तेज पथ पर चल पड़े थे,
 तो पांडुरंगी बन गए।

गौरव मनुष्यों का साकार करने
वो यज्ञ बन कर जलते रहे,
आओ मिलकर साथ आज हम
उस तेजपुत्र को वंदन करे..

 "दादाजी नमस्तुभ्यं"।
 "दादाजी नमस्तुभ्यं"।

- सचेतन 
चेतन कोठावदे

Wednesday, October 1, 2025

विकारांचे सीमोल्लंघन!

दसरा - विजयादशमी हा सण केवळ उत्साह वाढवणारा दिवस नसून आपल्याला आत्मचिंतन करून शुद्ध होण्याची संधी देणारा दिवस आहे

दर वर्षी आपण रावण दहनाचा कार्यक्रम परंपरेनुसार पार पाडतो आणि विजयादशमी साजरी केली असे म्हणतो, पण केवळ बाहेरचा रावण जाळून अंतरमनात उजाळा येणार का हो?
माझ्या जीवनातील खरा रावण कोणता हे मी जाणले आहे का हो??

"मन से रावण जो निकाले राम उसके मन मे है!!"

 म्हणजेच आपल्या सर्वांच्या मनात रावण कुठेतरी घर करून उपस्थित आहेच.. विकारांच्या स्वरूपात! 

आपण सर्व विकसित तंत्रज्ञानाच्या युगात वावरतोय आपण मोठमोठ्या पदव्यांचे शिक्षण घेतो, मग वैयक्तिक आणि पारिवारिक उदरनिर्वाह करत असताना छोट्या मोठ्या चांगल्या पदांवर काम करतो , सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचा जपण्याचा प्रयत्न करत असतो अशा प्रकारे पद, पैसा आणि प्रतिष्ठा कमावत असताना आपले मन दुनियादारीच्या ह्या स्पर्धात्मक युगात सह‌जच विकारांच्या खोल गर्तेत; कधी खोलवर जाऊन बसते हे आपल्यालाच समजत नाही. परीणामी रावणाची दहा तोंडे काम, क्रोध, मोह, मत्सर, आळस, भीती, शंका, असत्य, अहंकार आणि लोभ ही आपल्या मनात बीभत्स तांडव करत असतात आणि जर वेळीच ह्या शत्रुवर आपण नियंत्रण नाही मिळवले तर तो आपल्याला गिळंकृत करू शकतो.

म्हणून आजचा दिवस "विजयादशमी" आपल्याला सांगते की आत्मचिंतन करा, शत्रु बाहेर नाही तर तो आत बसलाय अंतर्मनावर विजय मिळवा! स्वतःच्या कमकुवतपणावर शक्ती उपासना करून विजय मिळवा. मी दीन,हीन, दुबळा, लाचार नाही तर मी पराक्रमी आहे, शूर आहे सकारात्मक आहे हा सद्‌भाव स्थिर करा. भगवंताचा अंश माझ्यात आहे मी करू शकतो, बदलू शकतो हा विचार जीवनात स्थिर करून जीवन बदलवत नेणे हा खरा पराक्रम | माझ्या जीवनान मिळवलेले ज्ञान, प्रतिष्ठा ह्याचा अहंकार होऊ न देता नम्रतेने सर्वसमावेशक भूमिकेतून संघात्मक, एकत्रित कार्य उभे करणे हो पराक्रम आहे!

"Lead By The Example !" आपल्या जीवनातून चरित्रातून चांगल्या नीतीमूल्यांचा जागर करूयात, आत्मसंयम क्षमाशीलता, पराक्रम, नम्रता, सत्य, संस्कृती मूल्यांविषयी तत्परता हे प्रभू श्रीरामांच्या जीवनातील गुण आपण प्रयत्नपूर्वक चिंतन करून आपल्या जीवनात, आचरणात आणण्याचा प्रयत्न करुयात.  
समाजामध्ये एकात्मिक भावनेने काम करूया; मी केले माझ्यामुळे झाले हा अहंकार टाकून; "भगवंताने बुद्धी दिली म्हणुन शक्य झाले" असा नम्र आणि कृतज्ञतेचा भाव अधिक उदात्त आणि उन्नत आहे तो रुजवूयात !

आपल्या मनामनातील 'राम' अधिक विशाल केला तर रावणावर विजय साकार होईल आणि हीच खरी आजची विजयादशमी !

चला तर विकारांचे सिमोल्लंघन करून आळस, भय, मत्सर, शंका, स्वकेंद्रितपणा, अहंकार हे जाळून टाकुयात ! विकार रूपी रावणाच दहन करून, सत्‌गुणी रामाचं चिंतन करूया, सद्‌गुणांच सोनं लुटूया आणि खरा दसरा साजरा करूया !!

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात।।

-  सचेतन
चेतन कोठावदे,
पुणे (MH 15/12) 






Saturday, August 23, 2025

तुझ्या अस्तित्वाची मला जाण व्हावी

ऐशी वारी जीवनात पुन्हा पुन्हा व्हावी 
देवा तुझ्या अस्तित्वाची मला जाण व्हावी 

उत्कटता तुझ्या दर्शनाची हरी मना लाघवी 
दर्शनाने अवचित तुझ्या भाव गंगेत माधवी 

तुझ्या नामघोषात सारी वारी आज दंग 
गेले लयास व्यंग गाता तुक्याचे अभंग 

सरू दे - सरू दे दाहक वेदनेच रंग 
आत्ता उरली ओढ भेटी लाहो पांडुरंग 

कुठला कोण मी? मज आठवेना 
 पडला विसर अहंता सापडेना 

नाम स्पर्शाने तुझ्या झालो उदका समान 
माझे असे काही...आता उरले ना भान 

- सचेतन 

Wednesday, August 20, 2025

वंदन करने आये है


स्वर गंगा की इस तट पर..
सूर साधकोंका आज मेला है, 
राग यमन हो, या हो बिहाग..
हर गहराई मै आपको पाया है !!

मेरी जीवन की लघुता को
 जड से आपने मिटाया है !
तेजोमय हो जीवन मेरा
 विश्वास आपने जगाया है !

कैसे "हरी" का अंश बने तुम ?
फिर स्वरो का वंश बने तुम,?
बंदिश लेकर "रुपक" मन की 
गोकुल के जो कृष्ण बने तुम

मन मे भक्ती भाव लेकर..
और स्वरों का साज चढाकर, 
 हम वंदन करने आये है ,
आशिष पाकर आपका...
 हम सारंग बजाने आए है!

वंदन करने आये है हम
नतमस्तक होने आये है..
गुरु आपकी चरनों पर
पुष्प चढाने आये है..!!

- स्वर सचेतन 

Friday, February 28, 2025

ध्यास तू...

तूच जाणसि मनीचे सर्व
तूच माय अन बाप
तुजसाठी राहू कृतज्ञ
विसरून देहभान

तूच उत्तर प्रश्नांच् साऱ्या
तूच आशेचा किरण ...
दांभिक आहे सर्व पसारा
तूच एकची सत्य ..!!

अस्तित्वाचं तत्व तू!
जगण्यातलं मर्म तू!
तूच सर्वव्यापी पूर्ण!
अणू ते ब्रह्मांड तू!

गाभाऱ्यातला आत्मा तू
देहातल चैतन्य तू
हरवलेल्याची माय तू
भटकलेल्यांच ध्येय तू

तूच सर्वव्यापी पूर्ण
तूच अणू ते ब्रह्मांड
तुला कोण नाकरेल
नकरातला आकार तू!

असलास तू तर जाग आहे
नसतास तू तर केवळ आभास आहे

आहेस तू- तर जाग आहे
नाहीस तू- तर जग आभास आहे
कसे कोण नाकारेल तुला?
नकारातला आकार तू!

तूच जाणसि मनीचे सर्व
तूच माय अन बाप रे
तुजसाठी राहू कृतज्ञ
विसरून देहभान हे!

- सचेतन
चेतन कोठावदे,पुणे (MH 15/12)

Thursday, May 16, 2024

किनाऱ्यावर हजार लाटा...

कुठे शोधू सांग सागरा??
हरवले शिंपले समाधानाचे,
संपत्तीच्या किनाऱ्यावर
एक अब्जाधीश भिकारी आहे!

मैलांचा प्रवास करून येते 
नदी भेटावयास घेऊन गूज,
कसा सामावतोस तिला तू 
सहज,भोवरे हटवून दूर

कोलाहल विसरून वेदनेचे
मनुष्य सुख ओरबडत आहे
नाव सोडून अस्तित्वाची
वृथा अहंकारात बुडत आहे

हरी नाही जीवनात 
शुष्क हृदयी काहूर आहे,
तुझ्या पाहून असंख्य वृत्ती
जीवन प्रवाहित होवू पाहत आहे

किनाऱ्यावर आलो तुझ्या
मनात हजार लाटा घेऊनी,
शांत कसे व्हावे शिकलो
तुझ्या धरांच्या कुशीतूनी!

सम साधावी जगण्यातली
समतोल तुझा पाहून
"गम" जावा आम्ही विसरून
तुझा "गss मss" ऐकून...

तुझ्या किनाऱ्यावर 
अशी काय जादू आहे?
लाखो व्यथा रित्या येथे..
संकल्प नवे बांधून जात आहे!


- चेतन कोठावदे, नाशिक
(From तारकर्ली बीच)