तू छावा आहे सिंहाचा;
कळपात मेंढरांच्या हरवू नकोस,
तू जन्म घेतला मानवाचा;
निर्मनुष्य होवूनी मरु नकोस,
हा खेळ असे जरी संचितांचा;
दंभात अस्तित्व हरवू नकोस।
यत्नातूनच होते यश साकार,
युयुत्सु वृत्ति टाकू नकोस।
वंशज तू अगस्त्यमुनींचा,
वेदनांच्या सागरासमोर क्षीण बनू नकोस।
वंद्य वाल्मीकिंचा तू अभ्यासक,
घात जरी झाला शस्राने;
तरी शास्त्र कधी टाकू नकोस।
आस्तिकाचे नुकसानच भारी,
म्हणून नास्तिकाचा नाद धरु नकोस।
येईल कधी चीड़ आप्त-स्वकियांचीच,
तरीही स्वधर्मा कधी त्यागू नकोस।
असे अंश तू चैतन्याचा;तैसेचि जगी सर्व,
अतः कुणास हीन गणू नकोस।
कुणी दुष्कर्मात माहीर;
तर कुणी सत्कर्मास आतुर,
"भाग्य लिहिले जाते कर्मानेच"
हे अलिखित; कधी विसरु नकोस।
अतीव रोचक महाभारत;
म्हणून गीता कधीही वगळू नकोस।
अर्जुनाच्या रुपात तूच होता;
हे तर्क लावूनही नाकारू नकोस।
तू छावा आहे सिंहाचा,
कळपात मेंढरांच्या हरवू नकोस।।
- चेतन कोठावदे